हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

जालन्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कडक कारवाईस सुरुवात; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वात विशेष पथके स्थापन

On: October 7, 2025 3:00 PM
Follow Us:
अवैध वाळू वाहतुकीविरोधात कडक कारवाईस सुरुवात; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वात विशेष पथके स्थापन

जालना, (बातमीवाला): जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या दिशानिर्देशानुसार, महसूल विभागाने जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीला लगाम घालण्यासाठी मोहीम उघडली आहे. यासाठी खास पथके तयार करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत.

हनुमंतखेडा गावाजवळ महसूल पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या बोटींमधील सामग्री जप्त करून ती नष्ट केली. तसेच, या धाडीत मिळालेला वाळूचा साठा घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.

मागील एका वर्षात महसूल विभागाने एकूण ४९ अवैध वाहने ताब्यात घेतली आहेत. त्यापैकी २७ वाहनांवर गुन्हे नोंदवण्यात आले असून, या कारवायांमधून प्रशासनाने १ कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जाफराबाद तालुक्यातही विभागाने ४३ ठिकाणी अचानक तपासण्या करून ४८९ ब्रास वाळूचा साठा जप्त केला. हा साठाही घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.

मागील वर्षभरात कुंभारझरी, हनुमंतखेडा, आळंद आणि देऊळझरी या भागांत एकूण १६ अवैध बोटी नष्ट करण्यात आल्या. या कारवायांदरम्यान सुमारे ८० लाख रुपयांचे साहित्य जप्त करून नष्ट केले गेले.

दरम्यान, नदीपात्रात कारवाई करताना पथकांना काही आव्हाने येत आहेत. नदी मुख्य रस्त्यापासून २ ते ३ किलोमीटर दूर असल्याने वेळेवर पोहोचणे कठीण होते. दलदलीचा भाग, काटेरी झुडपे आणि पाणी यामुळे बोटी पकडणे अवघड जाते. शिवाय, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे कारवाईत उशीर होतो, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

महसूल विभागाच्या सततच्या धाडींमुळे अवैध वाहतूक करणाऱ्या बोट आणि वाहन मालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने पुढील काळात आणखी कठोर उपाययोजना करणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Raj Dhanve

हे गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत कार्यरत आहेत. बँकिंग, फायनान्स, गुंतवणूक, नोकऱ्या, सरकारी धोरणे, योजना, राजकारण आणि ब्लॉगिंग या विषयांवर ते सातत्याने लिहितात. बातमी फक्त सांगणं नव्हे, तर तिचा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय होतो हे समजावून सांगणं, हा त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. अचूक माहिती, विश्वासार्ह स्रोत आणि निष्पक्ष मांडणी यावर त्यांचा भर असतो, जेणेकरून वाचकांना योग्य निर्णय घेता येतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!